समाजात आपल्या आजुबाजूला दररोज अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्याच्या वयोमानानुसार प्रतिक्रियाही उमटतात. मात्र आपण ती गोष्ट सर्वांसोबत 'शेयर' करू शकत नाही. कारण आपल्याकडे माध्यम नाही. ही उणीव लक्षात घेवूनच मी हा ब्लॉग चालू केला आहे.
या ब्लॉगमध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वच लेखांशी, बातम्यांशी आपण सहमत असालच असे नाही. मात्र त्यावरील आपली प्रतिक्रिया जरूर कळवावी; चांगली- वाईट कोणतीही. कारण ते जिवंतपणाचे लक्षण असते. या ब्लॉगमध्ये कोणत्याही एकांगी विचारधारेचा समावेश नसणार आहे. राष्ट्रीय हितासाठी जे चांगले त्याचे सदैव स्वागत असणार आहे . कोणत्याही पक्षाशी आपण बांधील असणार नाही . जे चांगले ते चांगले, जे वाईट ते वाईट हीच भूमिका असणार आहे. आपणही आपले विचार, लेख, बातम्या पाठवू शकता. त्याचे सदैव स्वागत राहील. त्यासाठी vijaypath150@gmail .com या ईमेल आयडी वर मेल पाठवा. सोबत फोटो असेल तर तो ही पाठवा.
आपला मित्र ,
सागर सुरवसे
९७६९१७९८२३/ ९६६५८९९८२३
९७६९१७९८२३/ ९६६५८९९८२३
0 comments:
Post a Comment